Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
- मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
- ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
- संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
- विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
- आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
- नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
- शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Author: जगदिश निळकंठ सोनवणे
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार तालुक्यातील शनिमाडळ, तिलाली, तलवाडे आणि रनाळे परिसरातील शेकडो शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून मोठी राजकीय घडामोड घडवून आणली आहे. महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या विकासदृष्टी आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार डॉ. गावित, माजी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील तसेच जिल्हा परिषदेचे शनिमाडळ गटाचे माजी सदस्य प्रवीण पाटील उर्फ मुन्नादादा प्रमुख उपस्थितीत पार पडला. भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये तिलाली गावचे माजी सरपंच व…
नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक समीकरणात मोठा बदल घडवणारी घटना म्हणजे ‘संसद रत्न’ पुरस्कार विजेत्या माजी खासदार डॉ. हीना विजयकुमार गावित यांचे पक्षात झालेले जोरदार पुनरागमन. भाजपात पुनःप्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत केलेली वक्तव्ये केवळ राजकीय भूमिका नसून पक्षासाठी येणाऱ्या काळात मार्गदर्शक दिशादर्शक ठरणारी ठरली आहेत. त्यांचे पुनरागमन हे नंदुरबार भाजपासाठी नवा श्वास मानला जात आहे. 🔹 राजकीय पुनरागमनाची पार्श्वभूमी गेल्या काही महिन्यांत डॉ. गावित यांनी पक्षाचा तांत्रिक राजीनामा दिला होता, मात्र त्यांनी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम आणि विविध संघटनात्मक उपक्रम राबवले. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची प्रक्रिया केवळ औपचारिक होती. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा…
भारताची एकता ही केवळ कायद्याने लादलेली नाही; ती दैनंदिन जीवनात, सणांमध्ये, कलाप्रकारांमध्ये, संगीतामध्ये आणि सामायिक परंपरांमध्ये अनुभवली जाते. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त, राष्ट्रनिर्माणात संस्कृती आणि विविधतेची भूमिका ओळखणे हे देश कसा विविधतेचा उत्सव साजरा करताना सुसंवाद टिकवतो याचे सर्वांगीण आकलन देते. ◆◆ भारताचा सांस्कृतिक मोझेक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतात शेकडो भाषा, डझनभर धर्म आणि असंख्य सांस्कृतिक प्रथा आहेत. सण, विधी आणि कलात्मक अभिव्यक्ती या समुदायांमधील पूल म्हणून काम करतात, परस्पर समज आणि आदर वाढवतात. या माध्यमांतून नागरिकांना आपली वेगळेपण आणि सामूहिक ओळख दोन्ही साजरी करता येतात. प्रादेशिक मेळे, लोककला सादरीकरणे आणि पारंपरिक सण विविध पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणतात आणि भौगोलिक, जातीय किंवा…
🔷 नंदुरबारचा सामाजिक आणि राजकीय पट — संघर्ष, विचार आणि आशेचा प्रवास नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर कोपऱ्यातील भौगोलिकदृष्ट्या मागास, परंतु विचारांनी प्रगल्भ असा प्रदेश. येथील डोंगरकपारींमध्ये राहणारा आदिवासी समाज, वंचित घटक आणि शोषित वर्ग आजही आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहे. या संघर्षाच्या भूमीतून नेहमीच काही विचारवंत, समाजसेवक, आणि लढवय्ये नेते निर्माण झाले आहेत. अशाच या भूमीत आज एक नव्या युगाचा प्रवास सुरू झाला आहे वंचित बहुजन आघाडी आणि तिचा तरुण नेता श्री सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली!— 🔷 सुनील सूर्यवंशी — संघर्षातून उभा राहिलेला तरुण नेता फक्त 33 वर्षांचा हा तरुण! पण विचार मात्र अत्यंत प्रगल्भ. डॉ. बाबासाहेब…
नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर झालेल्या तालुकानिहाय आरक्षण सोडतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसून आले आहे. अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणामुळे अनेक गटांची संरचना बदलली असून गेल्या वर्षभरापासून लोकसंपर्क, सामाजिक बांधिलकी, मंडळांमधील सहभाग, वर्गण्या, कार्यक्रमांमध्ये उपस्थिती अशा माध्यमांतून आपली ताकद दाखवणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिलांसाठी गट राखीव झाल्याने बहुतेक सर्वसामान्य व नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून येणाऱ्या पुरुष उमेदवारांना या वेळी स्पर्धेबाहेर रहावे लागणार आहे.…
नंदुरबार (प्रतिनिधी) – “रक्तदान म्हणजे मानवतेचे खरे पूजन” या भावनेला जीवनधर्म मानणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुन्हा एकदा नंदुरबारचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. मध्यप्रदेशातील महाकाल नगरी उज्जैन येथे झालेल्या भव्य समारंभात या संस्थेला ‘राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म.प्र. – 2025’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान ‘उज्जयनी रक्त संचार संस्था सेवा गृप, उज्जैन’ यांच्या वतीने प्रदान करण्यात आला असून, श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा हा वर्ष 2025 मधील चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे — जे त्यांच्या अखंड सेवाभावाचे प्रतीक आहे. 🩸 सोशल मीडियातून निर्माण झालेली जीवनदायिनी साखळी नंदुरबारमधील या फाऊंडेशनने व्हॉट्सॲप ग्रुपच्या…
“धर्म, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा महामहोत्सव – गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहीदी शताब्दी सोहळ्याची जय्यत तयारी” क्षेत्रीय आयोजन समिती अध्यक्षपदी सरदार डॉ. विजय सतबीर सिंग, सहअध्यक्षपदी श्रावण चव्हाण यांची नियुक्ती या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती नंदुरबार (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीच्या अभेद्य एकात्मतेचे प्रतीक आणि हिंद-की-चादर म्हणून जगभर ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहून देशवासीयांना गुरुंच्या महान त्याग, साहस आणि धर्मरक्षणाच्या संदेशाचे स्मरण करून देणार आहेत. राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून आणि…
आजच्या बदलत्या काळात, आभाळभर दोस्तांच्या दुनियेत प्रत्येकाच्या काळजावर अधिराज्य गाजवणारे, कार्य व कर्तृत्वाने जिल्ह्याच्या नेतृत्वाला नवे दिशा व नवा दृष्टिकोन देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच ‘विशाल बाबा मोहन माळी’! अफाट उत्साह, निर्भय कार्यशैली, प्रामाणिक विचार आणि लोककल्याणाची तळमळ या चार गुणांनी घडलेले हे व्यक्तिमत्त्व आज नंदुरबारच्या जनमानसात ‘आपले बाबा’ म्हणून ओळखले जाते. “ज़मीर ज़िंदा हो तो राहें खुद बखुद बनती हैं, इरादे नेक हों तो मंज़िलें झुक कर सलाम करती हैं…” 🕊️ माळी कुटुंबाचा सामाजिक वारसा वडील नानासाहेब मोहन माळी आणि आई शकुंतलाताई माळी यांच्या संस्कारातून विशाल बाबांनी समाजकारणाची प्रेरणा घेतली. घरातील संस्कारांमुळेच बालपणापासूनच इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची वृत्ती त्यांच्यात दृढ झाली.…
मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप अधिसूचनेवर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्याची संधी असेल. प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील स्थानिक…
‘दुर्गा दौड’मधे डॉ. विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; श्रद्धा व राष्ट्रप्रेमाचा संगम नंदुरबार (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, नंदुरबार विभाग आयोजित पारंपरिक ‘दुर्गा दौड’ यंदाही जयघोष, भक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या गजरात पार पडली. या प्रेरणादायी सोहळ्यात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तरुणांना नवचैतन्याचा संदेश दिला. विशेष म्हणजे, डॉ. विजयकुमार गावित व डॉ. सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांसमवेत धर्मध्वज हाती घेऊन बरेच अंतर चालत उपस्थिती लक्षणीय ठरवली. त्यांच्या सहभागामुळे या दौडीचे आकर्षण अधिक वाढले. दौडीची सुरुवात ग्रामदैवत आई खोडाईमाता मंदिरात महाआरतीने झाली.…

