Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम
- शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात
- ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भरती घोटाळा उघडकीस; उच्चस्तरीय चौकशी व फौजदारी कारवाईची जोरदार माग
- कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
- नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
- लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
Author: जगदिश निळकंठ सोनवणे
“यंग प्रोफेशनल्स राउंडटेबल”मधून डिजिटल वेलनेस, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माणावर मंथन नंदुरबार, (दि. 29 मे 2026) देशाला “विकसित भारत 2047” या ध्येयाकडे नेण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर मानसिकदृष्ट्या सक्षम, तंत्रज्ञानसाक्षर आणि मूल्याधिष्ठित युवा पिढी घडविणे अत्यावश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश नंदुरबार येथे आयोजित “Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026 – Young Professionals Roundtable” या विशेष कार्यक्रमातून देण्यात आला. युवकांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने नंदुरबार जिल्ह्यात नव्या वैचारिक चळवळीची सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली माय भारत नंदुरबार आणि झेप फाउंडेशन (World Digital Detox Day) यांच्या संयुक्त विद्यमाने…
शहादा (प्रतिनिधी) अवैधरित्या अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना शहादा पोलिसांनी धाडसी कारवाई करत ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २० किलो ५६४ ग्रॅम सुका गांजा व दुचाकीसह एकूण ४ लाख ८१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दि. १५ मे २०२६ रोजी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. हेमंतकुमार पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम धडगावकडून असलोद मार्गे शिरपूरकडे मोटारसायकलद्वारे सुका गांजा वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे श्री. पाटील यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने पंचांसह असलोद-दामळदा रोडवरील संस्थानजवळ सापळा रचला. रात्रीच्या सुमारास संशयित अवस्थेत…
नंदुरबार (प्रतिनिधी) ७ मे २०२५ च्या रात्री भारतीय वायुसेनेने अवघ्या २३ मिनिटांत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ महत्त्वाच्या लक्ष्यांवर अचूक हल्ले करत “ऑपरेशन सिंदूर” यशस्वीरीत्या पार पाडले. आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह-मार्गदर्शित शस्त्रे, लोइटरिंग ड्रोन आणि अचूक गुप्तचर माहितीच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या या कारवाईने भारताची लष्करी क्षमता आणि तांत्रिक प्रगती जगासमोर अधोरेखित केली आहे. या मोहिमेदरम्यान भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणांना निष्प्रभ करत अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीने लक्ष्यांवर हल्ले केले. विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईचे पुरावे ४८ तासांच्या आत उपग्रह चित्रांच्या माध्यमातून समोर आले. Maxar, KawaSpace आणि MizarVision या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या चित्रांमध्ये पाकिस्तानातील शाहबाज…
नंदुरबार – जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांनी संतापाची लाट उसळली आहे. गोरगरीब रुग्णांचे आधारस्थान असलेल्या या संस्थेत भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय निष्काळजीपणा झाल्याची चर्चा जोर धरत आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, कंत्राटी भरतीत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव, नियमबाह्य नियुक्त्या आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोणतीही अधिकृत निविदा प्रक्रिया न राबविता करण्यात आलेली महागडी संगणक खरेदी हा देखील गंभीर गैरप्रकार मानला जात आहे. “या खरेदीला परवानगी कोणी दिली?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.…
कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नंदुरबार जिल्ह्यात कायद्याची अंमलबजावणी ही केवळ प्रक्रिया न राहता ती जनतेसाठी सुरक्षिततेची हमी बनावी, यासाठी ज्या काही मोजक्या अधिकाऱ्यांनी सातत्याने धडाडीने काम केले आहे, त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत सुभाष पाटील साहेब यांचे नाव ठळकपणे पुढे येते. त्यांच्या कार्यशैलीत कठोरता आहे, पण त्यामागे न्यायाची स्पष्ट भूमिका आणि जनतेच्या विश्वासाचे भक्कम भान आहे. गेल्या काही काळात त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात उभारलेली मोहीम ही केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नाही, तर ती परिणामकारक आणि दूरगामी ठरलेली आहे. गुन्हे उघडकीस आणताना त्यांनी दाखवलेली तपासकौशल्य, तांत्रिक दक्षता आणि संघटनात्मक नेतृत्व यामुळे अनेक गुन्हेगारी साखळ्या मोडीत निघाल्या. चोरी, घरफोडी, दरोडे अशा पारंपरिक…
केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) च्या नेतृत्व संरचनेत आयपीएस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नुकतेच सुरू झालेले वादविवादाने तीव्र मतप्रकट केले आहेत, विशेषतः जे सीएपीएफमध्ये पूर्णपणे कॅडर-आधारित कमांड मॉडेलची मागणी करत आहेत. थेट भरती झालेल्या सीएपीएफ अधिकाऱ्यांच्या करिअर प्रगती, मनोधारणा आणि संस्थात्मक ओळखीच्या चिंता निश्चितपणे योग्य विचारात घेण्यायोग्य आहेत, परंतु यापलीकडे मोठा संस्थात्मक चित्र दुर्लक्षित करता येणार नाही. हा मुद्दा केवळ बढती किंवा पदांचा नाही. तो मूलभूतपणे भारताच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेच्या रचनेशी, पोलिसिंग नेतृत्वाच्या संवैधानिक भूमिकेशी आणि केंद्र व राज्यांमधील सामरिक समन्वयाच्या गरजेशी संबंधित आहे. या चौकटीत, सीएपीएफमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नेतृत्व भूमिका तर्कसंगत आणि आवश्यक दोन्ही आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी भारतीय पोलिस…
नाशिक (प्रतिनिधी) नंदुरबार येथील युवा पत्रकार विशाल मोहन गायकवाड (माळी) यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार पदविका कोर्समध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हा कोर्स दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आला होता. या कोर्सचा पदवीदान समारंभ १५ मार्च रोजी नाशिक येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. हिमगौरी आडके-आहेर (महापौर, नाशिक मनपा), मा. अजय बोरस्ते (शिवसेना उपनेते तथा नगरसेवक) तसेच डॉ. आशाताई पाटील (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा – ग्राहक रक्षक समिती) उपस्थित होते. यावेळी अकॅडमीच्या संचालिका डॉ. कृतिका मराठे व डॉ. महेंद्र देशपांडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पत्रकार…
मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना-615 आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद लिपिकांच्या विविध मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लिपिकांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्यासंदर्भातील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान कनिष्ठ सहाय्यक लिपीक आणि वरिष्ठ सहाय्यक लिपीक या दोन पदांचे एकत्रिकरण करून “विकास सहाय्यक” हे नवे पदनाम देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच या पदासाठी विद्यमान S-6 वेतनश्रेणी कायम ठेवावी, अशी भूमिका संघटनेने मांडली. पदांचे एकत्रिकरण केल्यास प्रशासन व्यवस्थेवर व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर काही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य…
मुंबई (मुंबई) – महाराष्ट्र राज्य परिषद वर्गीय कर्मचारी कर्मचारी-615 संघ आणि भारतीय मजदूर यांच्या संयुक्त क्षेत्रीय जिल्हा परिषद लिपिकांच्या विविध लिपी ग्रामविकास मंत्री जय गोरे दालन बैठक पार पडली. या लिपिकांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकी दरम्यान कनिष्ठ सहायक लिपी आणि वरिष्ठ सहायक लिपीक दोन पदे एकत्र करून “विकास सहयोगी” हे नवे पदनाम आपले प्रस्ताव मांडण्यात आले. तसेच या पदासाठी S-6 वेतनश्रेणी व्यवस्था ठेवावी, अशी भूमिका मांडली. पदांचे एकत्रीकरणाचे परिणाम प्रचलित विश्वस्वरूप आणि परिणाम काही होणार नाही, सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यपद्धतीचे मत विचारात घ्या, मुख्य भूमिका जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.…
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे १९ हजार स्वयं सहायता समूह कार्यरत असून महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी अभियान प्रभावीपणे काम करीत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर शेजारील डोम येथे २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हास्तरीय ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हाधिकारी मिताली शेठी, जिल्हा…

