Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
- मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
- ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
- संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
- विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
- आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
- नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
- शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Author: जगदिश निळकंठ सोनवणे
नंदुरबार, दि. १६ जुलै : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शेती, आरोग्य, विकास कामे तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेणार आहेत. दौऱ्यानुसार, गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी रात्री ११.३० वाजता मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘विशाळगड’ येथून दादर रेल्वे टर्मिनसकडे प्रयाण करून रात्री १२.१५ वाजता दादर-भुसावळ एक्सप्रेसने ते नंदुरबारकडे रवाना होतील. शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी सकाळी ८.२५ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर आगमनानंतर ते शासकीय विश्रामगृहात दाखल होतील. सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉल (व्हीसी रूम) येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या…
मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन नंदुरबार | प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि भारतीय संविधानाच्या कलम 324 अन्वये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-2026) मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहेत. या मदत कक्षांच्या माध्यमातून मतदार यादीशी संबंधित माहिती, अडचणी आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम…
दोंडाईचा (प्रतिनिधी) दोंडाईचा येथील कोठारी पार्क परिसरातील रहिवासी सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या रोकडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती श्री. रतिलाल मुकुंदा रोकडे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, खोकराळे), पुत्र श्री. गोविंदराव रतिलाल रोकडे (माध्यमिक शिक्षक), पुत्र श्री. भानुदास रतिलाल रोकडे (शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नंदुरबार) तसेच सुना, नातवंडे व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांचा अंत्यसंस्कार शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता दोंडाईचा येथील त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघाल्यानंतर करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक, सामाजिक…
नंदुरबार जिल्ह्याचे युवा नेतृत्व श्री सुनील भाऊ सूर्यवंशी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या पदावरून होत नाही, तर त्याच्या विचारांवर, कर्तृत्वावर आणि समाजासाठी केलेल्या कार्यावरून होते. समाजातील शेवटच्या घटकाच्या वेदना स्वतःच्या मानून त्याच्या हक्कासाठी संघर्ष करणारे, सामान्य माणसांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि जनतेशी आत्मीयतेचे नाते जपणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणून ओळखले जाते. अशाच जनाधार लाभलेल्या युवा नेतृत्वांमध्ये श्री सुनील भाऊ सूर्यवंशी यांचे नाव आज नंदुरबार जिल्ह्यात विशेष आदराने घेतले जाते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्याचा गौरव करणे म्हणजे एका ध्येयवेड्या, अभ्यासू आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासारखे आहे. नंदुरबार हा आदिवासी, शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन…
नंदुरबार (प्रतिनिधी) राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे आपल्या कार्यातून सिद्ध करणाऱ्या माजी खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांचा वाढदिवस म्हणजे नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशासाठी प्रेरणेचा दिवस आहे. जनतेच्या प्रश्नांना दिल्लीच्या संसदेत ठामपणे मांडत विकासालाच राजकारणाचा केंद्रबिंदू बनविणाऱ्या डॉ. हिनाताई गावित यांनी आपल्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. तसेच खानदेशातून संसदेत पोहोचलेल्या पहिल्या आदिवासी महिला खासदार म्हणून त्यांनी इतिहास रचला. अवघ्या काही वर्षांत संसदीय कामगिरीच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले. सलग सात वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या त्यांच्या अभ्यासू आणि…
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधातील मोहिमेत आणखी एक मोठे यश संपादन करत आंतरराज्यीय मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या या धडाकेबाज कारवाईत तब्बल ३० लाख ३० हजार रुपये किमतीच्या ३२ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून नंदुरबार, नाशिक, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील एकूण १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने आढावा घेत संबंधित गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करण्याचे आणि सक्रिय गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे…
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अवैध धंदे, गंभीर गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेला सातत्याने यश मिळत असून, त्यातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई, गुन्ह्यांचा वेगाने उलगडा आणि अवैध व्यवसायांवर कठोर अंकुश यामुळे पोलीस दलाबद्दल जनतेचा विश्वास अधिक वाढत आहे. याच धडाकेबाज कारवाईचा भाग म्हणून नवापूर पोलिसांनी सुमारे ३५ लाख २० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि कंटेनर जप्त करत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवापूर येथील कुणाल हॉटेल परिसरात नाकाबंदी करून राजस्थान क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी…
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप, सोलार मोटारी, केबल, पाइप, कृषी अवजारे व इतर साहित्य चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, या प्रकारामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. कष्टाने उभी केलेली शेती आणि त्यासाठी घेतलेली साधनसामग्री चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली शिवारातील शेतकरी नथ्थू यादव पाटील यांनी शनिवारी तालुका पोलीस स्टेशन गाठून आपल्या शेतातून चोरीस गेलेल्या साहित्याबाबत तक्रार अर्ज सादर केला. त्यांनी पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तक्रारीनुसार, दि. २५ जून २०२६ रोजी रात्री अज्ञात…
नंदुरबार (प्रतिनिधी) शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता, शिक्षणप्रेम आणि लोककल्याणकारी कार्याची तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि बलिदानाची माहिती देण्यात आली. महापुरुषांचे विचार आणि कार्य हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव श्री. गणेश गोविंद पाटील तसेच महाविद्यालयाचे…
नंदुरबार (प्रतिनिधी) लोकशाही प्रक्रियेची ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून करून देण्यासाठी एकलव्य विद्यालयातील इयत्ता १० वी ‘क’ च्या वर्गात ईव्हीएम (EVM) अॅपद्वारे वर्ग प्रतिनिधी निवडणुकीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मोबाईलवरील ईव्हीएम अॅपचा वापर करून मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लोकशाहीचा अनुभव घेतला. शालेय जीवनात वर्ग प्रतिनिधी (मॉनिटर) निवडीसाठी पारंपरिक पद्धतीने चिठ्ठीद्वारे मतदान केले जाते. मात्र यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेची अनुभूती देण्यात आली. मतदानापूर्वी वर्गशिक्षक संतोष पाटील यांनी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि मतदारांनी पाळावयाचे नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची नावे ईव्हीएम अॅपमध्ये नोंदवून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदानाचा…

