Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
- मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
- ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
- संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
- विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
- आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
- नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
- शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Author: जगदिश निळकंठ सोनवणे
नंदुरबार (प्रतिनिधी) आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून तालुका स्तरावर जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. या तयारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून आज नंदुरबार शहरातील शहादा बायपास रस्त्यालगत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित व डॉ. सुप्रिया गावित प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. फित कापून झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात आमदार डॉ. गावित यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उत्साहाने झटण्याचे आवाहन केले. उद्घाटन प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जि.प. सदस्य…
नदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार तालुका विधायक संचना विद्यालय व कनिष्ठ सत्य शमांडळ येथील शाळानि दुरबार तालुका तालुका मैदानी कुलस्थानी घडवली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील सर व पर्यवेक्षक पि.यू. आव्हा यांच्या मार्गदर्शनात तरुण तसेच तडफदार कुलगुरू पंकज शिरसाठ सर यांच्या अथक परिश्रमा सरड मुख्य हे यश प्राप्त करतात. इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रथम क्रमांक साहिल भीमराव पानपाटील याने ८०० मीटर धावणे या गटात तालुकास्तरावर पटकावला. तर इत्ता नववीचा विद्यार्थी हरीश गोकुळ ठाकरे यांनी हातोडा फेक या प्रकार संपादन तालुका स्तरावर प्रथम क्रमांक केला. या दोन्ही परीक्षा यशस्वि नंद दुरबाराच्या तालुका मनोधैर्य कार्यालयाचे अध्यक्ष चेअरमन…
नंदुरबार (प्रतिनिधी) नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शहरात हिंदु सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदीपक कन्यापूजन सोहळा संपन्न झाला. मोठा मारुती मंदिर सभागृहात पार पडलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात १०९ कन्यांचे वैदिक मंत्रघोषात पूजन करून त्यांना नवीन कपडे, शालेय साहित्य व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कन्यांच्या नेत्रात देवीभाव तर पूजकांच्या डोळ्यांत भावाश्रू दिसत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री दुर्गामातेच्या महाआरतीने झाली. यानंतर मान्यवर व यजमानांच्या हस्ते कन्यांचे पाद्यपूजन करून विधिवत पूजन करण्यात आले. सर्व कन्यांना नवीन पोशाख परिधान करून शालेय उपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. कन्याभोजनाच्या माध्यमातून या कन्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख…
नंदुर (प्रतिनिधी) कालपर्वतबारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दुरबार कोली, ओसरली, अमळथे, होळ, मांजरे, निंभेल व शिवार सन्मानाचे अमर अक्षरशः नंद टाकले. एकीकडे शेतात डोल सर्वच बाजूच्या बाजूच्या बाजूच्या जागांत भविष्याची आशा दाटली होती; तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या झोडपाट्याने ती स्वप्ने क्षणात चिरडली. या अनपेक्षित पावसाने मिरची, पपई, केळी, कापूस, सोयाबीन यासह विविध पिकांचे मोठे नुकसान. अनेकांच्या शेतात पाणी साचणे उभी पिके आडवी, मूळ साडली, पाने गळाली, मेहनत दिवस काही क्षणांत मातीमोलंड. कोपर्लीतील शेतकरी दिलीप भगीरथ व सचिन वान्खेडे यांच्या एकर पपई पिकाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. “दररोज सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत घाम गाळले पाहिले. झटक्यात आता पुढचा भाग कसा गेला, घरखर्च कसा…
नंदुरबार (प्रतिनिधी) प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि नंदुरबार तालुका विधायक समिती यांच्या सहकार्याने बटेसिंगभैया रघुवंशी विधी महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी पार पडले. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पी. एन. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संघटित होणे व कायद्याचे ज्ञान मिळवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. बदलत्या कौटुंबिक परिस्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात धुळे विधी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वैभव सबनीस यांनी…
नंदुरबार (प्रतिनिधी) भारतातील आरोग्यसेवेच्या डिजिटल आणि प्रतिबंधात्मक प्रवासात मोठे पाऊल उचलत विदाल हेल्थ आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) प्रा. लि. यांनी एचपीव्ही लसीकरणासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे आणि लस अधिक सुलभ करणे हा आहे. दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून विदाल हेल्थचा डिजिटल प्लॅटफॉर्म हा देशातील पहिला असा प्लॅटफॉर्म ठरणार आहे, जिथे एचपीव्ही लसीसाठी सर्वकष (एंड-टू-एंड), कागदपत्रविरहित आणि कॅशलेस सुविधा उपलब्ध होईल. डॉक्टरची वेळ ठरवणे, संमतीपत्र भरणे, प्रमाणपत्र मिळवणे, डोसची आठवण करून देणे आणि उपचारांचे पालन या सर्व प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण केल्या जाणार आहेत. बजाज फिनसर्व्ह हेल्थची १००% मालकी असलेल्या…
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार येथील जी.टी.पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एककाचे उद्घाटन लोकमत वृत्तसमूह नंदुरबार जिल्हयाचे उपसंपादक मनोज शेलार यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.एम.जे. रघुवंशी होते. या प्रसंगी उपसंपादक मनोज शेलार यांनी राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी एककाच्या माध्यमातून स्वतःमध्ये चांगले संस्कार रुजवून, सुसंस्कारित समाज निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन करताना एक चांगला नागरिक बनून महाविद्यालयाचे तसेच जिल्ह्याचे नाव लौकिक करणे, हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेची फलश्रुती आहे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य.डॉ.एम.जे.रघुवंशी यांनी स्वयंसेवकांना शिस्त, परिश्रम आणि संघर्ष या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. मोबाईलच्या…
बामदोड (नंदुरबार), दि. २५ सप्टेंबर २०२५ – शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन सामाजिक जाणीव, सांस्कृतिक उपक्रम आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी परिसरात झाडे लावून हरित संदेश दिला. जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर नाटिका (स्ट्रीट प्ले) सादर करून औषधांचा योग्य वापर, दुष्परिणाम आणि फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका जनतेसमोर प्रभावीपणे मांडली. संस्कृती व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी रांगोळी स्पर्धा व रिल स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेशासोबत कलात्मक कल्पकता सादर केली. तसेच प्रबोधनात्मक रॅली…
नंदुरबार (प्रतिनिधी) –ग्रामपंचायत होळ तर्फे हवेली येथे “एक दिवस – एक तास – एक साथ” या घोषवाक्याखाली स्वच्छता ही सेवा २०२५ अभियानांतर्गत स्वच्छता महाश्रमदान मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमास पंचायत समिती नंदुरबारचे गटविकास अधिकारी सन्मा. अनिल बिराडे साहेब, सरपंच सन्मा. मनीष नाईक, विस्तार अधिकारी सन्मा. युवराज पवार नाना, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विजय पाटील आप्पा साहेब, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, सीआरसी प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा संकलन, गटारी व परिसर स्वच्छता या उपक्रमांवर भर देण्यात आला. ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती निर्माण झाली. स्वच्छतेतून आरोग्य आणि विकास साध्य होतो, यावर सर्व मान्यवरांनी…
छत्रपति संभाजिनगर दिनांक 24 ( प्रतिनिधि ) नाशिक येथे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करून मारहाण केली. या घटनेत अनेक पत्रकार गंभीर जखमी झाले असून, राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीचा हा धक्कादायक नमुना असल्याची तीव्र चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारी वाढण्याचे मूळ कारण हफ्तेखोरी व कायद्याच्या अंमलबजावणीतील कमजोरी असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. “राज्यात कॅबिनेट मंत्री असो, केंद्रीय राज्यमंत्रीची मुलगी असो वा पत्रकार असो, कुणीही सुरक्षित नाही. मग सामान्य गरीब जनता, महिला, शाळा-कॉलेजमधील मुली कशा सुरक्षित राहणार?” असा थेट सवाल लोकांमध्ये उपस्थित होत आहे. राज्याचे गृहमंत्री कमजोर आणि कमकुवत ठरत असल्यामुळेच राज्यात गुन्हेगारी वाढीस लागली आहे, अशी जनतेत चर्चा…

