Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम

May 29, 2026

शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात

May 16, 2026

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक

May 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम
  • शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात
  • ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भरती घोटाळा उघडकीस; उच्चस्तरीय चौकशी व फौजदारी कारवाईची जोरदार माग
  • कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
  • नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»नवापूर तालुक्यात हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास प्रारंभ
शैक्षणिक

नवापूर तालुक्यात हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास प्रारंभ

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 18, 2025No Comments30 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नवापूर तालुक्यात हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास प्रारंभ

नवापूर, (प्रतिनिधी)   संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या “शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम” अंतर्गत “सर्वाना सोबत घेऊन चला” हा मूलभूत गाभा प्रत्यक्षात आणण्यासाठी नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रांतर्गत हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास सुरुवात ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमात महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, शिक्षक सतिलाल भामरे, हेमलता वळवी, कृष्णा गावीत, विद्यार्थी तसेच पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेली १७ शाश्वत विकास ध्येये व त्याअंतर्गत भारत सरकारने १ जानेवारी २०१६ पासून देशभर अंमलात आणली आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करण्यासाठी “शाश्वत विकास नवरत्न” ही संकल्पना राबविली आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाचे विविध विभाग या माध्यमातून मार्गक्रमण करीत आहेत.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात पंचायत राज संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली अंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत बहुतांश योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. या योजनांद्वारे ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सुधारणा, लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे तसेच आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत सकारात्मक बदल घडविणे हे ध्येय आहे. असेही मनोगत गोपाल गावीत यांनी व्यक्त करण्यात आलेत.

शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यास मान्यता दिली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहित करण्यासाठी सन २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य या चार स्तरांवर पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या अभियानाचे सात मुख्य घटक निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत (स्वनिधी, व लोकवर्गणीतून आर्थिक स्थैर्य), जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग आणि श्रमदानातून लोकचळवळ उभारणे या बाबींचा समावेश आहे. असेही ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत यांनी व्यक्‍त करण्यात आले आहेत.

अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा निश्चित करण्यात आला आहेत. नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चौरे, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनीही मार्गदर्शन केले आहे.

या माध्यमातून स्वच्छतेबरोबरच शाश्वत विकासाला गती मिळून ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे दिशा देण्यात येईल, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत असा विश्वास मुख्याध्यापक काकुस्ते सरांनी व्यक्त करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

March 6, 2026

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न

December 15, 2025

पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा

December 10, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025800

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025764

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025600

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025563
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.