Author: जगदिश निळकंठ सोनवणे

जगदिश निळकंठ सोनवणे

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

अक्कलकुवा (प्रतिनिधी)  अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयातील एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक महेश कुवर हे नंदुरबार जिल्ह्यात राबवित असलेल्या रक्तदान चळवळीची दखल घेऊन त्यांचा आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला.        महेश कुवर हे गेल्या 15 वर्षा पासुन अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयात एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. महेश कुवर हे एच. आय. व्ही. एड्स या गंभीर आजाराबाबत समाजात, विद्यार्थ्यांत, तसेच समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, यांच्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुन एच. आय. व्ही. एड्स या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे नियमित काम करत असतांना नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल अनेमिया, थॅलेसिमिया,…

Read More

    नंदुरबार (प्रतिनिधी)    शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून देत अनेक अडथळ्यांवर मात करुन विद्यार्थिनींना शिक्षण क्षेत्रात उभं करुन त्यांच्यात नवं चैतन्य निर्माण करुन एक आदर्श निर्माण करणाऱ्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती रामचंद्र लष्करी यांना अहिल्यारत्न म्हणुन गौरव करण्यात आला.      राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या समर्पित सेवेचा गौरव करण्यात आला. अक्कलकुवा या  आदिवासी बहुल क्षेत्रातील रहिवासी असलेल्या डॉ ज्योती लष्करी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले व सोबतच लहान भाऊ बहिणी यांचे देखील शिक्षण पूर्ण केले. डॉ. ज्योती लष्करी यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे डॉ. कविता साळुंके…

Read More

(जगदिश निळकंठ सोनवणे) नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रांझणी गावचा सुपुत्र, समाजकारणाला ध्यास मानून राजकारणाची वाट चालणारे नाव म्हणजे अमोलभाऊ प्रल्हाद भारती. “समाजासाठी निस्वार्थीपणे काम करत राहायचं, त्याचं मोजमाप समाजच करतो,” हा विचार मनाशी बाळगून ते गेली दोन दशके सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. 🌱 समाजकारणाची सुरुवात ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या अभ्यासिकेपासून त्यांच्या समाजकारणाचा प्रवास सुरू झाला. प्रसिद्धीच्या झोतात न राहता त्यांनी हा उपक्रम आजवर चालू ठेवला. शिक्षणप्रेमी वृत्तीमुळे २००९ मध्ये मंडई फाउंडेशनची स्थापना करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके पुरवली आणि युवकांना योग्य दिशा देण्याचे कार्य हाती घेतले. 🏛️ राजकीय पाऊलवाट राजकारणात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

इच्छा पूर्ण करणे म्हणजे कृपा ही भक्ती नाही- विरेंद्र बामणे इंग्लिश मिडीयम निरंकारी संत समारंभ नंदुरबार नगरीत उत्साहात संपन्न नदुरबार (प्रतिनिधी) सद्गुरु ची जीवनाची भूमिका सांगितली सद्‌गुरु जगाच्या कल्याणासाठी अवतरत असते. आणि भक्ति हा श्रद्धा व समर्पणाचा विषय आहे. आज विश्व भक्ती प्रत्येक मानव करत आहे पण त्याचे भाव फक्त मायेशी निगडीत आहे. इच्छा पूर्ण के देवाची कृपा. जीवनात प्रगती म्हणजे देव पावला पण देवाला प्राप्त व्हा असे कोणालाच वाटत नाही. संत समजवता देव पहावयशी तेथे देवच झालो हे प्राप्त होणे आहे, असे ब्रह्मज्ञान प्रचारक वीरेंद्र बामणे यांनी सांगितले.      धुळे झोन ३६-बी अंतर्गत झोनयम इंग्लिश मिडी निरंकारी संत…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड (ता. नंदुरबार) येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचा (National Pharmacovigilance Week) शुभारंभ उत्साहात पार पडला. औषधांच्या सुरक्षित वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी उद्घाटन केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी फार्माकोव्हिजिलन्सचे औषध सुरक्षा व्यवस्थेमधील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “औषधांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्रात भविष्यात मोठ्या संधी आहेत.” या सप्ताहाचे पहिले आकर्षण म्हणून ई-क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली. Google Forms च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फार्माकोव्हिजिलन्सशी संबंधित विषयांवरील…

Read More

नवापूर तालुक्यात हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास प्रारंभ नवापूर, (प्रतिनिधी)   संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या “शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम” अंतर्गत “सर्वाना सोबत घेऊन चला” हा मूलभूत गाभा प्रत्यक्षात आणण्यासाठी नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रांतर्गत हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास सुरुवात ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमात महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, शिक्षक सतिलाल भामरे, हेमलता वळवी, कृष्णा गावीत, विद्यार्थी तसेच पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेली १७ शाश्वत विकास ध्येये व त्याअंतर्गत भारत सरकारने १ जानेवारी २०१६ पासून देशभर अंमलात आणली आहेत. या पार्श्वभूमीवर…

Read More